

किल्लेमच्छिंद्रगड : राज्यांतील अनेक भागांमध्ये पाणथळ प्रदेशांची समस्या हे एक मोठे आव्हान आहे. ही समस्या सोडवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालिल महायुतीच्या सरकारने तज्ञांच्या मदतीने एक योजना तयार करणे गरजेचे आहे. तरच क्षारपड जमिनीचा प्रश्न निकाली निघून उपजावू जमिनी टिकणार आहेत. अन्यथा उद्योग, व्यवसाय, कारखाने आदी मुलभत विकासाच्या कारणाने जमिनी कमी होत चालल्या आहेत, त्यात क्षारपड जमीन क्षेत्राची वाढ झाल्यास नजीकच्या काळात वाढत्या लोकसंख्या वाढीस पुरेल इतका अन्न धान्य पूरवठा करण्याचे मोठे आव्हान निर्माण होणार आहे.