-जयसिंग कुंभार
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन मेळाव्यात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली. राज्यभरात चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले. जयंतरावांच्या मनात याबद्दल तर्क लढवले जाऊ लागले. त्यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा आजच नव्हे, तर अनेक वर्षांपासून होत आली आहे. अलीकडे तर दोन-चार महिन्यांतून एखादा मुहूर्त साधून माध्यमे टीआरपीसाठी हात धुऊन त्यांच्या मागे लागलेली दिसतात. प्रत्यक्षात ते काय करतील, याबद्दल आजघडीला अंदाज लढवण्यापलीकडे फारसे काही हाती लागताना दिसत नाही.