
सांगली : जिल्ह्यातील 35 गावांना बोटींची आवश्यकता आहे. सध्या 15 बोटी खरेदीसाठी निविदा काढण्यात आली आहे. येत्या 10-15 दिवसांत पूर आल्यास काय करणार असा प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित करीत जलसंपदा मंत्र्यासमोर नाराजी व्यक्त केली. येत्या काही दिवसांत पूर आला तर काय नियोजन आहे, याचे उत्तर जलसपंदा मंत्री जयंत पाटील यांना देता आले नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
जलसंपदा मंत्री व पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पूर नियंत्रण आढावा बैठक झाली. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी बैठकीस उपस्थित होते. सभागृहात वडनेरे समितीच्या अहवालावर चर्चा सुरु असताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपाययोजनाबाबत चर्चेस सुरवात केली. जिल्ह्यातील 35 गावांना बोटींची आवश्यकता आहे. सद्या 15 बोटी खरेदीसाठी निवीदा काढण्यात आली आहे. येत्या 10-15 दिवसांत पूर आल्यास काय करणार असा प्रश्न पडळकर यांनी उपस्थित केला. यावरुन मंत्री जयंत पाटील व त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला.
आमदार पडळकर म्हणाले, गेल्यावर्षी बोटी नसल्याने ब्रम्हनाळ सारखी दुर्घटना घडली. सध्या पावसाचा जोर वाढला आहे. येत्या दहा- पंधरा दिवसात पूर आला तर काय करायचे असा प्रश्न मंत्री पाटील यांना विचारला असता, त्यांनी सभाच थांबवतो असे उत्तर दिले. निवीदा काढलेल्या बोटी कधी मिळणार याचे उत्तर त्यांच्याकडे नाही, त्या बोटींचे इंजिन जपानमधून येणार असल्याचे सांगतात. पण ते कधी येणार हे त्यांना माहित नाही. त्यामुळे आजची बैठक म्हणजे केवळ फार्स केला असल्याची टीकाही त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.