सांगली जिल्ह्यात 12 हजार हेक्‍टरवरील पंचनामे पूर्ण;  उर्वरित पंचनामे चार दिवसांत, 18 हजार क्षेत्र बाधित

Panchnama completed on 12 thousand hectares in Sangli district; 18 thousand areas were affected
Panchnama completed on 12 thousand hectares in Sangli district; 18 thousand areas were affected

सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अठरा हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. 29 हजार 404 शेतकऱ्यांचे 11 हजार 976 हेक्‍टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले. यात सर्वाधिक तासगाव तालुक्‍यातील 2 हजार 133 हेक्‍टरवरील पंचनाम्यांचा समावेश आहे. अद्याप सात हजार हेक्‍टरवरील पंचनामे अपूर्ण असून, चार दिवसांत ते पूर्ण केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांनी आज दिली. 

वादळी आणि परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. चार-पाच दिवस सर्वत्र तुफान पाऊस पडला. खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत या तालुक्‍यात परतीच्या पावसाने कहरच केला. यामुळे शेतीला फटका बसला आहे. डाळींब, द्राक्ष, भुईमूग, ऊस, तूर, भाजीपाला आदींचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. चार ते पाच फूट इतके सध्या शेतात पाणी साचून राहिले आहे.

नदीकाठची शेती, वाहून गेली. अनेक ठिकाणी बांध फुटल्याने शेतीचे नुकसान झाले असून, प्रशासनाकडून पंचनामे केले जात आहेत. नजरअंदाजे 19 हजार हेक्‍टरवरील पिके बाधित झाली आहेत. मागील सहा महिने कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकटात शेती आणि शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. कोरोनाची महामारी कमी होत असताना आता परतीच्या पावसाचा तडाखा बसला आहे. 

आज पावसाचा अंदाज 
दरम्यान, जिल्ह्यात उद्या (ता. 25) परतीच्या पावसाची सांगता होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्याच्या पूर्व, तासगाव, मिरज, पलूस आणि कडेगाव तालुक्‍यातील काही ठिकाणी मध्यमस्वरूपांच्या पावसाची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यानंतर मात्र थंडी पडण्याची शक्‍यता आहे. 

तालुकानिहाय पंचनामे असे... 
जिल्ह्यातील 29 हजार 404 शेतकऱ्यांचे 11 हजार 976 हेक्‍टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तालुकानिहाय शेतकरी व हेक्‍टरवरील पंचनामे असे- मिरज- 2826 शेतकरी व 1624 हेक्‍टर, वाळवा- 3,613 शेतकरी, 945 हेक्‍टर, शिराळा- 4,147 शेतकरी, 647 हेक्‍टर, पलूस-1,235 शेतकरी, 291 हेक्‍टर, कडेगाव- 1,087 शेतकरी, 273 हेक्‍टर, खानापूर- 3,030 शेतकरी 1,363 हेक्‍टर, तासगाव- 3,876 शेतकरी 2,133 हेक्‍टर, आटपाडी-3,631 शेतकरी 1,887 हेक्‍टर, कवठेमहांकाळ- 3,457 शेतकरी 1,599 हेक्‍टर आणि जत तालुक्‍यातील 2,502 शेतकऱ्यांचे 1,310 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com