

Rising air pollution and changing climate conditions
sakal
सांगली : काही वर्षांपूर्वी खोकला वर्षातून एकदा यायचा. औषधोपचार घेतले की, चार-पाच दिवसांत बरा व्हायचा. आता औषधोपचार घेऊनही खोकला बरा होत नाही. तसेच वर्षातून अनेकदा खोकला लागत आहे. प्रदूषण आणि प्रतिजैविकांची वाढलेली मात्रा हेच खोकला लवकर बरा न होण्यामागचे कारण आहे, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.