अजित पवार म्हणतात राजकारणात शब्दाला महत्त्व नसते?

ajit_pawar
ajit_pawar

मंगळवेढा : सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पडद्यामागे घडलेल्या नाट्यमय घडामोडी आता समोर येऊ लागल्या आहेत. सत्तेजवळ असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी समाधान आवताडे यांच्या गटाला दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी आपला कौल भाजप समविचारी आघाडीला दिल्यानंतर, संख्याबळ कमी लागताच त्यांना गळ घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा "आम्ही अध्यक्षपदासाठी भाजपला शब्द दिला आहे, तो शब्द मी बदलणार नाही' असे आवताडे यांनी सांगताच अजितदादा यांनी "राजकारणात शब्दाला महत्त्व नसते, परिस्थिती बघून शब्ददेखील बदलावे लागतात' असे विधान केले. याची चर्चा सध्या तालुक्‍यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मंगळवेढा तालुक्‍याची निर्णायक भूमिका
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मंगळवेढा तालुक्‍याने निर्णायक भूमिका घेतल्याचे दिसून आले. अवघ्या तीन सदस्यांच्या जोरावर जिल्ह्याच्या राजकारणात भविष्यात स्वतःच्या घरात एकही पद न मागता कार्यकर्त्यांना पदे मिळवून देण्याची ताकद लावण्यात समाधान आवताडे हीरो ठरले. सुरवातीच्या काळात या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना गृहीत न धरल्याचा फटका बसला आहे.

शब्दाला ठाम राहिल्याने भाजप-समविचारी पक्षांची सत्ता
शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीने दोन्ही पदांची ऑफर दिली; पण दिलेल्या शब्दाला समाधान आवताडे ठाम राहिल्याने भाजप - समविचारी पक्षांची सत्ता स्थापन करता आली. पुण्यात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार संजय शिंदे यांच्या बरोबरीने दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हे देखील उपस्थित होते. अतिविश्‍वासू नेत्याने निर्णय प्रक्रियेत संजयमामांना सोबत घेतले नाही; परंतु जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याची माहिती दिली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com