Maharashtra Karnataka Krishna River water dispute
esakal
बेळगाव : कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा नदीवर प्रस्तावित राधाकृष्ण सिंचन प्रकल्पांतर्गत (RadhaKrishna Irrigation Project) नवीन धरण बांधण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला कन्नड संघटनांनी विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पामुळे कर्नाटकात येणाऱ्या कृष्णा नदीच्या पाण्यात घट होईल आणि चिक्कोडी तालुक्यातील कल्लोळ बंधारा, हिप्परगी बंधारा तसेच अालमट्टी धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम होईल, असा दावा करत राज्य सरकारने तातडीने हरकत नोंदवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.