सांगली : कृष्णा बंधारा बचावासाठी वज्रमूठ

जागतिक पर्यावरण दिनी सांगलीकर एकवटले आणि त्यांनी बंधाऱ्याचा एक दगड काढून दाखवा
कृष्णा बंधारा बचावासाठी वज्रमूठ
कृष्णा बंधारा बचावासाठी वज्रमूठsakal

सांगली : येथील कृष्णा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा पाडण्याला विरोध करत आज सांगलीकरांनी मानवी साखळी केली. जागतिक पर्यावरण दिनी सांगलीकर एकवटले आणि त्यांनी बंधाऱ्याचा एक दगड काढून दाखवा, असे खुले आव्हान देत वज्रमूठ आवळली. भाजपचे प्रदेश सचिव तथा बंधारा बचाव आंदोलनाचे निमंत्रक पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षविरहीत एकजूट दाखवण्यात आली.

सांगली येथील कृष्णा नदीवरील बंधारा पाडण्याचा निर्णय झाल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगलीवाडीतील एका कार्यक्रमात जाहीर केले. त्याचा पत्रकार परिषदेत पुनरुच्चार केला. म्हैसाळ येथे छोटे धरण (बॅरेज) बांधून तेथेच पाणी अडवण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. त्याला विरोध करत पृथ्वीराज पवार यांनी सांगलीकरांची वज्रमूठ बांधण्यासाठी पुढाकार घेतला. त्याचे पहिले मानवी साखळी आंदोलन आज सकाळी सात वाजता बंधाऱ्यावर झाले. बंधाऱ्याच्या सर्व भिंती लोकांनी भरून गेल्या होत्या. हातात हात गुंफून या बंधाऱ्याला पाडू द्यायचे नाही, असे निर्धार सांगलीकरांनी केला.

माजी आमदार नितीन शिंदे, भाजप नेत्या नीता केळकर, शेखर इनामदार, हणमंत पवार, नगरसेवक विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी, युवराज बावडेकर, भारती दिगडे, उर्मिला बेलवलकर, शिवप्रतिष्ठानचे हणमंत पवार, रेखा पाटील, प्रदीप कांबळे, बलदेव गवळी, नागरीक विकास समितीचे सतीश साखळकर यांच्यासह विविध पक्ष संघटना एकत्र आल्या.

बॅरेज बांधायला विरोध नाही, मात्र त्याचा परिणाम सांगलीवर नको.

म्हैसाळ बॅरेजसाठी सांगलीचा बंधारा पाडणे गरजेचे असल्याचे तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करा.

सांगली बंधारा ही सांगलीच्या पिण्याच्या पाण्यासाठीची व्यवस्था आहे. म्हैसाळचा बॅरेज पाणी अडवेल, मात्र त्यात सांगलीतील शेरीनाल्यासह चार नाल्यांचे पाणी थेट मिसळेल. तेच विषयुक्त पाणी सांगलीकरांनी प्यावे का?

मगरींचा अधिवास सार्वत्रिक झाल्यास कृष्णा व वारणाकाठ अधिक धोकादायक होईल. नदीत पोहताच येणार नाही.

पाटबंधारे निवृत्त उपअभियंता विजयकुमार दिवाण यांच्या अभ्यासानुसार, बॅरेजमुळे सुमारे ४ हजार एकर क्षेत्र कायम पाण्याखाली राहणार. त्याची भरपाई कोण, किती, किती काळ देणार?

महापौरांच्या माहितीनुसार नाल्यांचे पाणी शुद्ध करून ते नदीत सोडण्यासाठी सुमारे ६० कोटी रुपयांची गरज आहे. ही योजना कधी प्रस्तावित होणार? त्याला मंजुरी कधी मिळणार? काम कधी होणार? त्याआधीच बंधारा पाडायची घोषणा का?

सांगली बंधारा कोल्हापुरी पद्धतीचा आहे. बरगे काढल्यानंतर पाणी वाहून जाते. तो पंधरा फूट उंच आहे. महापुराचे पाणी ५५ फूट असते. बंधाऱ्यावर ४० फूट पाणी असते. मग छोटा बंधाराच महापुराचे पाणी अडवतोय, असा जावई शोध कुणी लावला?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com