Miraj Kisan Rail latest news
esakal
सांगली : जिल्ह्यातील भाजीपाला, फळांसह इतर सर्व शेतमाल देशभरातील बाजारपेठेत कमी वेळेत व कमी खर्चात पाठविण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मांडलेल्या किसान रेलच्या प्रस्तावाला अखेर रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली (Sangli agricultural produce transport railway) आहे. यामुळे मिरज ते पुणे-मुंबई आणि मिरज ते दिल्ली किसान रेल चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. श्री. काकडे यांच्या बदलीनंतर हा प्रस्ताव मागे पडला होता. त्याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर चारच दिवसांत रेल्वे प्रशासनाने ‘हिरवा कंदील’ दाखविणारे पत्र जिल्हा प्रशासनाला दिले.