शेवगाव : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत तालुक्यातील 20 हजार 542 शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी 108 ठिकाणी व्यवस्था केल्याची माहिती प्रभारी तहसीलदार असिमा मित्तल यांनी दिली.
हेही वाचा - भगवानबाबांच्या बंदुक, तलवारीची चोरी
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत राज्य सरकारने एक एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेल्या आणि 30 सप्टेंबर 2019 अखेर थकीत असलेल्या अल्प मुदतीच्या व पुनर्गठित पीककर्जाचे मुद्दल व व्याजाची एकूण दोन लाखांपर्यंत रक्कम माफ केली आहे. त्यात तालुक्यातील 20 हजार 542 शेतकरी पात्र ठरले असून, त्यांच्या कर्जखात्यांचा तपशील "अपलोड' झाला आहे. या शेतकऱ्यांना उद्यापासून (ता. 28) कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.
त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार कार्ड प्रमाणीकरण करावे, असे आवाहन प्रभारी तहसीलदार मित्तल व सहायक निबंधक अनिल भांगरे यांनी केले आहे.
आधार प्रमाणीकरणासाठी जिल्हा सहकारी बॅंकेच्या 16 शाखा, राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या नऊ शाखा, आपले सरकार केंद्र व कॉमन सर्व्हिस सेंटर 83, अशा एकूण 108 ठिकाणी सोय केली आहे.
केंद्रात जाताना आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, कर्ज थकबाकीचा तपशील, संस्थेची पावती सोबत न्यावी, असे आवाहन तहसीलदार मित्तल यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.