सोलापूर : शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) सोमवारी संपल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आता विद्यार्थ्यांसह पालकांना निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. शेवटचा पेपर संपताच विद्यार्थ्यांनी रंगपंचमीच्या दोन दिवसाआधीच एकमेकांना रंग लावून सेल्फी काढत आनंद साजरा केला.