
सोलापूर : देशात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला तरीही काही भाग हैदराबादच्या निजामाने ताब्यात ठेवला होता. यात सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावांसह मराठवाड्यातील आठ जिल्हे रझाकारांची जुलमी राजवट भोगत होते. १७ सप्टेंबर १९४८ ला हैदराबाद मुक्ती होईपर्यंत या ५८ गावांनी पारतंत्र्य भोगले आहे.