
सोलापूर : वाऱ्यासह अवकाळी पावसाने बुधवारी (ता. १३) सायंकाळी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ७७५ विजेचे खांब कोसळले. तर १८.८८ किलोमीटर अंतराच्या तारा तुटल्या. त्यामुळे महावितरणचे नुकसान झाले. तर ११० गावे अंधारात बुडाली. या गावांतील वीजपुरवठा गुरुवारी सुरू झाला आहे.