

Amit Thackeray Surveys Crop Loss in Mohol Taluka, To Raise Compensation Demand
sakal
मोहोळ: गारपिटीने झालेले शेतकऱ्यांचे नुकसान खूप मोठे आहे, त्यातून शेतकरी बाहेर पडणे कठीण आहे. झालेल्या नुकसानीची दाहकता मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समक्ष भेटून सांगणार असून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत अशी त्यांना विनंती करणार आहे. शेतकऱ्यांनो या संकटाने खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा धीर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिला.