आनंदाची बातमी! मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या; पुणे, नागपूर, लातूर अन्‌ उधना ते मिरजपर्यंत सात फेऱ्या

मिरजेपर्यंत या एकेरी विशेष गाड्यांसह सात फेऱ्या होणार असून मध्य रेल्वे सध्या ८३ आषाढी विशेष गाड्या चालवत आहे. ६ जुलै रोजी आषाढीचा मुख्य सोहळा होणार आहे. मात्र, पंढरपूरकडे येणाऱ्या व परत जाणाऱ्या भाविकांची वर्दळ आषाढी एकादशी पूर्वी व नंतरही असते.
Central Railway to operate 83 Ashadhi Wari special trains for pilgrims, with multiple trips from Pune, Latur, Nagpur, and Udhna.
Central Railway to operate 83 Ashadhi Wari special trains for pilgrims, with multiple trips from Pune, Latur, Nagpur, and Udhna.Sakal
Updated on

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने एकूण सात विशेष गाड्या सोडलेल्या आहेत. यामध्ये १ ते १० जुलैपर्यंत पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर अशा ३ एकेरी आषाढी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. तसेच उधना-मिरज विशेष गाडीच्या ४ फेऱ्या होणार आहेत. मिरजेपर्यंत या एकेरी विशेष गाड्यांसह सात फेऱ्या होणार असून मध्य रेल्वे सध्या ८३ आषाढी विशेष गाड्या चालवत आहे. ६ जुलै रोजी आषाढीचा मुख्य सोहळा होणार आहे. मात्र, पंढरपूरकडे येणाऱ्या व परत जाणाऱ्या भाविकांची वर्दळ आषाढी एकादशी पूर्वी व नंतरही असते. यामुळे मध्य रेल्वेने १ ते १० जुलै दरम्यान विशेष गाड्या सोडल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com