

Ujani Water Row Intensifies Amid Poll Buzz; Farmers Await Clear Decision
Sakal
सोलापूर: उजनीचे पाणी कर्नाटकने उमराणी बंधाऱ्यात अडवून आठवडा लोटला. मात्र, याप्रश्नी अद्याप तोडगा न निघाल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील सात गावांतील शेती अन् पिण्याच्या प्रश्न दिवसेंदिवस तीव्र बनत आहे. पिकांना पाण्याची गरज असूनही पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांतील नाराजी वाढत आहे. आठवड्यानंतरही सत्ताधारी भाजपला निवडणुकीतील नेमणुकांमधून वेळ मिळत नसल्याने आता शेतकरीच आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत.