
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ६५ हजार ६२० शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीचा विमा मिळणार आहे. त्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात उद्या (सोमवारी) ८९ कोटी ८५ लाखांची भरपाई वितरित होणार आहे. राजस्थानमधील कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते ही रक्कम बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात वग केली जाणार आहे.