

Farmers Demand Canal Water as Ujani Dam Fills to 52%, El Niño Concerns Delay Decision
sakal
सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण ५२ टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यातील दोन टीएमसी पाणी शासनाच्या परवानगीने आषाढी वारीसाठी भीमा नदीत सोडले जाणार आहे. दुसरीकडे, जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी शेतीसाठीही पाणी सोडण्याची मागणी केली आहे. पण, ‘एल निनो’च्या संकटामुळे धरणातून पाणी सोडण्यासाठी शासनाच्या परवानगीची अट घालण्यात आली आहे.