सोलापूर – राजुरी येथील गोविंद पर्व कारखाना अखेर राणा शिपिंग कंपनीकडे अधिकृतरीत्या सुपूर्त करण्यात आला आहे. हा कारखाना सेवानिवृत्त शिक्षक, आदिनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक लालासाहेब जगताप यांनी जिल्हा बँकेकडून कर्ज घेऊन सुरू केला होता. मात्र तांत्रिक अडचणींबरोबरच चुकीच्या व्यवस्थापनामुळे हा कारखाना बंद पडला आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कोट्यवधी रुपये थकीत राहिले होते.