Solapur News: 'उजनी धरणाचे सर्व दरवाजे बंद, विसर्ग थांबविला'; धरणात ११ हजार क्युसेकची आवक

८ जुलैपर्यंत उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले जाणार नाही, जेणेकरून आषाढी वारीचा सोहळा व्यवस्थित पार पडेल हा हेतू आहे. उजनी धरणात सध्या दौंड व स्थानिक परिसरातून १२ हजारांहून अधिक क्युसेकची आवक जमा होत आहे.
Ujani Dam Update: Water Discharge Stopped Amid Rising Inflow
Ujani Dam Update: Water Discharge Stopped Amid Rising InflowSakal
Updated on

सोलापूर/पंढरपूर : पंढरीच्या पांडुरंगाचा आषाढी वारीचा सोहळा ६ जुलैला पंढरपुरात रंगणार आहे. त्यासाठी राज्यभरातून १३ ते १५ लाख भाविक पंढरपूरमध्ये असणार आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रभागेत वारकऱ्यांना स्नान करता यावे, वाळवंट परिसरात पाण्याचा विसर्ग जास्त राहू नये, यासाठी आता उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी पूर्णत: बंद करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) सकाळपर्यंत चंद्रभागेच्या वाळवंट परिसरातील विसर्ग कमी होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com