Manoj Jarange Patil
sakal
पंढरपूर : तांदूळवाडी (ता. माळशिरस) येथे विहिरीत टेम्पो कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या बावचे आणि सातोरे कुटुंबीयांच्या नातेवाईकांची मंगळवारी मनोज जरांगे-पाटील यांनी पंढरपूर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेत सांत्वन केले. यावेळी त्यांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.