किरीट सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरे सरकारमुळे कोव्हिड हत्याकांड !

किरीट सोमय्या म्हणाले की उद्धव ठाकरे सरकार कोव्हिड मृत्यूदर लपवत आहे
Kirit Somaiya
Kirit SomaiyaMedia Gallery
Updated on
Summary

किरीट सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील कोव्हिड मृत्यूंची माहिती लपवली आहे. त्यामुळे भाजप येत्या काळात महाराष्ट्रातील कोव्हिड मृत्यूचं स्पेशल ऑडिट करणार आहे.

सोलापूर : कोरोना लसीकरणावरून (Covid Vaccination) मुंबईमध्ये कॉंग्रेस (Congres) केंद्र सरकारच्या (Central Government) विरोधात आंदोलन (Agitation) करत आहे. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उद्धव ठाकरे सरकारमुळे (Uddhav Thackeray government) झालेल्या कोव्हिड हत्याकांडावरून लक्ष वळवण्यासाठी कॉंग्रेस हे आंदोलन करत असल्याची टीका भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी केली. किरीट सोमय्या हे आज (शनिवारी) सोलापूर दौऱ्यावर आहेत. या वेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ठाकरे सरकार, शरद पवार (Sharad Pawar) व कॉंग्रेसवर टीका केली. (Kirit Somaiya said that Uddhav Thackeray government is hiding the death rate of Covid)

Kirit Somaiya
मुलीला व्हायचंय पोलिस ! पालकांनी पहाटे विवाह उरकण्याचा काढला मुहूर्त

किरीट सोमय्या म्हणाले, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही माहिती आहे की, भारतात लसींचे उत्पादन दोन कंपन्या करतात आणि त्यातील महत्त्वाची कंपनी ही पुण्यात असून, त्याचे मालक हे शरद पवारांचे मित्र आहेत. लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन वर्षात 10 कोटी होत असेल तर देशातील सर्व लोकांना लस मिळायला बारा महिने लागणार आहेत. दरम्यान, एप्रिल महिन्यात जे मृत्युकांड महाराष्ट्रात झालं आहे त्याचा आणि लसीचा काय संबंध आहे, असा प्रश्नही सोमय्यांनी उपस्थित केला.

Kirit Somaiya
15 जूननंतर उठणार जिल्हाबंदी? सार्वजनिक वाहतुकीवर 50 टक्‍क्‍यांची मर्यादा

उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील कोव्हिड मृत्यूंची माहिती लपवली आहे. त्यामुळे भाजप येत्या काळात महाराष्ट्रातील कोव्हिड मृत्यूचं स्पेशल ऑडिट करणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तेरा महत्त्वाच्या शहरांमध्ये माझ्यासह किरीट आणखी दोन सीए मिळून हे ऑडिट करण्यात येणार आहे, असेही सोमय्या म्हणाले.

त्याचबरोबर येत्या 31 डिसेंबरपर्यंत भारतात अडीचशे कोटी लसी येणार आहेत. त्यातील सव्वादोनशे कोटी लसी भारतात बनवल्या जाणार आहेत, तर पंचवीस कोटी लसी इंपोर्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत प्रत्येक भारतीयांच लसीकरण झालेलं असेल, असंही किरीट सोमय्या या वेळी म्हणाले.

बातमीदार : विश्‍वभूषण लिमये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com