Educational News: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! दहावीत दोन विषयांत अनुत्तीर्ण झाला तरी मिळणार अकरावीत प्रवेश

Solapur News : इयत्ता दहावीमध्ये एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या केवळ राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश देण्याची सवलत लागू केली आहे. त्यांचा हा प्रवेश तात्पुरता म्हणजे दहावीतील सर्व विषय उत्तीर्ण होईपर्यंत राहणार आहे.
Educational News
Educational NewsSakal
Updated on

सोलापूर : दहावी परीक्षेत एक अथवा दोन विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलैमधील पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. शनिवारी (ता. ७) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे प्रभारी शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी परिपत्रक काढले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com