

Mangalwedha Faces Severe Drought Threat After Rainfall Deficit Leaves Kharif Season Crops Damaged And Farmers Worried
esakal
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा :ऑगस्ट संपला तरी पावसाने मारलेल्या दडीमुळे मंगळवेढ्यात अत्यंत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेला असून, जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला.प्रशासकीय उपाययोजना राबविण्याबाबतच्या हालचाली संथ असून दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासन कमालीचे उदासीन असल्याने शेतकऱ्यातून नाराजी पसरत आहे.