

116 Lakh Cubic Meters Silt Removed from Solapur Dams; Major Step Towards Water Conservation
sakal
सोलापूर: जिल्ह्यातील २१२ प्रकल्पातून गाळ काढण्यास मंजुरी देण्यात आली होती, त्यापैकी १६५ प्रकल्पातून तीन वर्षात ११६.८६ दशलक्ष घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे. गाळमुक्त धरण योजनेचा ८ हजार ६५६ शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून ३ हजार २८० हेक्टर सुपीक झाली आहे तर धरणातील गाळ काढल्याने ११ हजार ६८६ सहस्र घनमीटर इतक्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.