Solapur News : म्हैसाळ योजनेतून सांगोल्याच्या शेवटच्या गावांना पुरेशा दाबाने पाणी द्या; आ. बाबासाहेब देशमुख यांची अधिवेशनात आग्रही मागणी!

Mhaisal Irrigation : सांगोला तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या शेवटच्या गावांना कमी दाबाने पाणी मिळत असल्याचा गंभीर प्रश्न अधिवेशनात मांडण्यात आला. यावर तातडीने कार्यवाही करू, असे जलसंपदा मंत्र्यांनी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा आहे.
MLA Dr. Babasaheb Deshmukh Raises Irrigation Crisis in Assembly

MLA Dr. Babasaheb Deshmukh Raises Irrigation Crisis in Assembly

Sakal

Updated on

सांगोला : सांगोला तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शेवटच्या आठ गावांना पाणी कमी दाबाने मिळत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. हा गंभीर प्रश्न विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मांडत आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी या गावांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची आग्रही मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी “योग्य ती कार्यवाही तातडीने करू,” असे आश्वासन सभागृहात दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com