गझलकार बदिउज्जमा बिराजदार यांनी पितृदिनाचे औचित्य साधून वडिलांवरील कवितेचे सादरीकरण केले. ग्रामीण साहित्यिक अरुण नवले यांनी निसर्गावरील कविता सादर केली. कवयित्री राजश्री जाधव यांनी मोबाईल या विषयावरील कविता सादर केली.
"Poets reciting their soulful verses at Sakav Katta as literature lovers applaud every line."Sakal
सोलापूर : पावसाळी वातावरण, बाहेर हलक्या पावसाच्या सरी, हॉलमध्ये कवींच्या बहारदार कवितांची बरसात आणि दर्दी रसिकांची तेवढीच आत्मियतेने मिळणारी दाद... निमित्त होते...साकव फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जगदीश पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या काव्य मैफिलीचे.