मंगळवेढा - मोबाईलच्या अतिरेकामुळे विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठापर्यंतची वाचन संस्कृती कमी होत चालल्यामुळे अनेक नात्यांमध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे दुरावा निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत आनंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाने परभणी ते कोल्हापूर 555 किलोमीटर सायकल यात्रा करून वाचन संस्कृती रूजवण्यासाठी कृती कार्यक्रम राबवला.