

Shankhnaad by Project-Affected Families in Pandharpur Against Proposed Corridor
Sakal
पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिर परिसरातील प्रस्तावित विकास आराखड्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक विस्थापित होण्याची तसेच प्राचीन सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तू नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी विकास आराखडा रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून, मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.