Ramai Awas Yojana : ‘रमाई’साठी फक्त ६७० लाभार्थी, उरले १९ दिवस; जिल्ह्याला अडीच हजारांहून अधिक घरकुलांचे उद्दिष्ट

Solapur News : समाज कल्याण विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास योजना राबविली जाते. राज्य सरकारने ग्रामीण क्षेत्रासाठी २०२४-२५ वर्षांकरिता पाच महिन्यांपूर्वी उद्दिष्ट जाहीर केले आहे.
Only 670 beneficiaries enrolled in the Ramai scheme as the district approaches its goal of 2,500+ homes within 19 days.
Only 670 beneficiaries enrolled in the Ramai scheme as the district approaches its goal of 2,500+ homes within 19 days.Sakal
Updated on

सोलापूर : राज्य सरकारने रमाई आवास योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्याला अडीच हजारांहून अधिक घरकुलांचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयास जिल्ह्यातून केवळ ६७० पात्र लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास आता केवळ १९ दिवस उरले आहेत. त्यामुळे उद्दिष्ट पूर्तीसाठी समाज कल्याण विभागाची धावपळ सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com