
वाळूज(सोलापूर) ः भोगावती नदीवरील देगाव(वा)(ता.मोहोळ ) येथील बंधाऱ्याची भिंत मंगळवार(ता.13) आणि बुधवारी(ता.14) झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा वाहून गेली. या बंधाऱ्याच्या पूर्वेला असलेल्या आतकरे वस्तीवरील 20 ते 25 शेतकरी आणि त्यांचे कुटूंबीय महापुराच्या पाण्यात गेल्या पाच दिवसापासून अडकून पडले आहेत.
हेही वाचाः सोलापूरच्या ग्रामीण भागात 93 नवे कोरोनाबाधित
वस्तीला पाण्याचा वेढा पडल्याने तसेच काही शेतकऱ्यांच्या वस्तीत पाणी शिरले. त्यांनी उंचावरील इतरांच्या घरात आश्रय घेतला. दोन तीन दिवस पीठमीठ तेल कसेतरी पुरले. शेतातील भाजीपाला पिके महापुरात वाहून गेले. आता खायचे काय आणि जगायचे कसे ? हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता. पाच दिवस झाले हे लोक अडकले आहेत. पूर थोडा ओसरला आहे ; तरीही पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने आणि बंधाऱ्याची पश्चिमेकडील भिंत वाहून गेल्याने प्रचंड मोठे भगदाड पडले आहे. त्यातून पाण्याचा मोठा प्रवाह वाहात आहे.
बंधारा आणि अलिकडील बाजू यात जवळजवळ नव्वद फुटाचा पाण्याचा खोल प्रवाह वाहत आहे. त्यामुळे या वस्तीचा गावचा संपर्क तुटलेलाच आहे. येथील युवक रवी आतकरे , किरण आतकरे, रणधीर ताकभाते, दत्तात्रय आतकरे, प्रताप आतकरे, विशाल आतकरे, सागर आतकरे यांच्यासह इतरांनी एक युक्ती केली. तीनशे ते चारशे फूट लांब नायलॉन दोरीच्या टोकाला दगड बांधून ती दोरी बंधाऱ्या वरील पुरग्रस्त शेतकऱ्यांकडे फेकली. त्यांनी त्याचे एक टोक पकडून पुन्हा तो दगड परत माघारी भिरकावला अशा प्रकारे डबल रोप वे तयार केला. त्याला भाकरी भाजी सह इतर जीवनावश्यक वस्तू बांधून ते ओढून घेतले तर शेतातील जनावरांच्या दुधाचे कॅन त्याला बांधून गावातील कुटूंबीयांना पोहोच केले.यामुळे बंधाऱ्याच्या पलिकडे अडकलेल्यां लोकांच्या अन्न पाण्याची सोय झाल्याने त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.