पंढरपूर तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस!

वाळू माफियांवरील पोलिस आणि महसूल प्रशासनाचा वचक कमी झाल्याने वाळूचोरीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे.
sand file photo
sand file photoesakal
Summary

वाळू माफियांवरील पोलिस आणि महसूल प्रशासनाचा वचक कमी झाल्याने वाळूचोरीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे.

पंढरपूर (सोलापूर) : मागील काही दिवसांपासून पंढरपूर तालुक्यात वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. भीमानदीपात्रातून दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरु आहे. वाढत्या वाळूचोरीमुळे भीमानदीचे पात्र संकटात आले आहे. वाळू माफियांवरील पोलिस आणि महसूल प्रशासनाचा वचक कमी झाल्याने वाळूचोरीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. भीमानदी पात्रातून होणारी अवैध वाळू उपसा आणि वाहतूक बंद करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. दरम्यान वाळू माफियांनी पुळूज बंधाऱ्यांचे दरवाजे काढून पाणी सोडून दिल्याचा प्रकारही समोर आला आहे. बंधाऱ्यातील पाणी सोडून दिल्यामुळे नदीकाठच्या 14 गावातील शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

sand file photo
पंढरपूर : कार्तिकी वारीसाठी 3289 पोलिस कर्मचारी तैनात

भीमानदी पात्रातील पाणी कमी झाल्याचा फायदा घेत वाळू माफियांनी पुन्हा डोके वर काढले आहे. सध्या पंढरपूर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरु आहेत. त्यामुळे वाळूला मागणी वाढली आहे. रातोरात हजारो रुपये मिळवण्याच्या लालसेतून अवैध वाळू उपसा व वाहतूकीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. अशातच अवैध वाळू उपसा आणि वाहतुकी विरोधातील पोलिस आणि महसूल विभागाची कारवाई बोथट झाल्याने वाळू माफियांचे धाडस वाढले आहे. त्यामुळेच बिनदिकपणे दिवसाढवळ्या वाळूची चोरी केली जात आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला पोलिस आणि महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचेच अभय असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

sand file photo
सिद्धिविनायक, शिर्डी सुटले; कॉंग्रेसच्या वाट्यातील पंढरपूर का लटकले?

भीमानदीकाठच्या शेळवे, कौठाळी, खेडभाळणी, इसबावी, शिरढोण, चिंचोली भोसे, शेगावदुमाला, गोपाळपूर, मुंडेवाडी, सरकोली, आंबे, चळे, पोहरगाव, पुळूज आदी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरु आहे. पोलिस आणि महसूल विभागाचे साफ दुर्लक्ष असल्यानेच वाळू उपसा सुरु असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांमधून केला जात आहे. वाळू उपसा करण्यासाठी वाळू माफियांनी पुळूज (ता.पंढरपूर) येथील बंधाऱ्यांचे दरवाजे काढून पाणी सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंधाऱ्यातून पाणी सोडून दिल्यामुळे बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या जवळपास 14 गावांतील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याबाबत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनी तक्रार केली आहे.

जिल्हा पथकाकडूनही कारवाईकडे दुर्लक्ष...

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाकडून या मागणीला काही दिवसांपासून अवैध वाळू उपसा आणि वाहतूकी विरोधातील कारवाई थंडच आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या स्वतंत्र पथकाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक पोलिसांनी ही अवैध वाळू कारवाईकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com