
सांगोला : नीरा उजवा कालव्याच्या फाटा क्रमांक पाचला २२५ क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून, येत्या पाच ते सहा दिवसांत लाभक्षेत्रातील शेवटच्या गावांपर्यंत पाणी पोहोचणार आहे. त्यानंतर चिंचोली तलाव पूर्ण क्षमतेने भरला जाणार असल्याची माहिती माजी आमदार ॲड. शहाजी पाटील यांनी दिली.