

सोलापूर: राज्यात सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० हजार कोटींचा शक्तिपीठ महामार्ग करण्याचा अट्टहास आहे का? असा सवाल करत गडचिरोलीमधील खनिज निर्यात करण्यासाठी शक्तिपीठ करणार आहेत. यातून अदानी-अंबानी यांना फायदा करून द्यायचा आहे. त्यांच्यासाठीच हा महामार्ग करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज येथे केला.