Solapur : पावसाळ्यातच १४ गावे अन्‌ १२७ वाड्यांना टंचाईच्या झळा; जिल्ह्यातील पाण्याची स्थिती चिंताजनक; उजनी ६० टक्क्यांवर

पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, विसापूर, चिल्हेवाडी, कासारसाई, मुळशी, टेमघर, खडकवासला, गुंजवणी, वीर व उजनी ही धरणे अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत.
solapur
solapursakal

सोलापूर - पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला, तरीदेखील राज्यातील धरणांतील पाणीसाठा ६० टक्क्यांवरही गेलेला नाही. दुसरीकडे, पावसाळा अजून संपलेला नसतानाही राज्यातील ३१४ गावांसह ९९२ वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी टॅंकर सुरू आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील १४ गावे व १२७ वाड्यांवर टॅंकरने पाणी पुरविले जात आहे.

पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, विसापूर, चिल्हेवाडी, कासारसाई, मुळशी, टेमघर, खडकवासला, गुंजवणी, वीर व उजनी ही धरणे अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्याचा आधार असलेले उजनी धरण अद्याप ६० टक्क्यांवरच आहे. यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने खरीप हंगामात पाणी सोडता आलेले नाही. १५ ऑक्टोबर २०२३ ते १५ जून २०२४ या आठ महिन्यांचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.

शेतीला एक-दोन आवर्तने सोडली जातील, पण पहिले प्राधान्य पिण्यासाठीच असणार आहे. १५ ऑक्टोबरपर्यंतचा पाणीसाठा अंतिम मानून कालवा सल्लागार समितीच्या माध्यमातून धरणातील उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन केले जाणार आहे. शेतीला साधारणत: डिसेंबर-जानेवारीत एक आवर्तन सोडले जाते, पण यंदा हे पाणी फेब्रुवारीअखेरीस सोडले जाऊ शकते.

solapur
M. S. Swaminathan: काय आहे स्वामिनाथन आयोग? शेतकऱ्यांचे आंदोलन झालं की आजही येतो चर्चेत

जिल्हानिहाय टॅंकर

जिल्हा गावे वाड्या टॅंकर

नाशिक ९८ १४१ ८७

जळगाव ११ ०० ११

पुणे १० ६१ ११

सातारा ७९ ३५७ ८६

सांगली ३० २९१ ३५

सोलापूर १४ १२७ ०६

छ. संभाजीनगर ५५ ०२ ५९

जालना १६ १३ २८

एकूण ३१४ ९९२ ३२४

उजनी पाणीपातळी

solapur
NMC N Cap Fund : ‘एन-कॅप’ अखर्चिक निधी परतीच्या मार्गावर; 50 टक्के निधी अखर्चिक

दुसरीकडे, मार्च-एप्रिलमधील आवर्तन मे महिन्यात सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळा अजून संपलेला नसतानाही शेतकऱ्यांचीही चिंता वाढल्याची सद्य:स्थिती आहे. जिल्हानिहाय टॅंकर जिल्हा गावे वाड्या टॅंकर नाशिक ९८ १४१ ८७ जळगाव ११ ०० ११ पुणे १० ६१ ११ सातारा ७९ ३५७ ८६ सांगली ३० २९१ ३५ सोलापूर १४ १२७ ०६ छ. संभाजीनगर ५५ ०२ ५९ जालना १६ १३ २८ एकूण ३१४ ९९२ ३२४ उजनी पाणीपातळी पाणीपातळी ः ४९४.८६५ मीटर एकूण पाणीसाठा ः २७१३.१८ दलघमी (९५.८० टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा ः ९१०.३७ दलघमी (३२.१५ टीएमसी) टक्केवारी ः ६०.०० (सोमवारी रात्री दहाची स्थिती)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com