सोलापूर विधान परिषदेसाठी न्यायालयात जाणार; देशमुख

shrikant deshmukh
shrikant deshmukhsakal
Published on

सांगोला : राज्यातील विधान परिषदेचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून यामधून सोलापूर जिल्ह्याला वगळण्यात आलेले आहे. महाविकास आघाडीने सत्तेचा गैरवापर करून हा खटाटोप केला आहे. त्यामुळे या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी भाजपने केली असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दिली आहे.
पूर्वीच्या नगरपालिका आणि नगरपंचायती महापालिका आणि जिल्हा परिषदेचे जवळपास ४१५ पैकी ४१० मतदार पात्र आहेत. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यकारी मंडळातील ७५ टक्के पेक्षा अधिक सदस्य पात्र ठरतात.

त्यामुळे सोलापूर जिल्ह्याची निवडणूक होवू शकते. मात्र, या निवडणुकीतून सोलापूर जिल्ह्याला वगळण्यासाठी नव्याने घोषित झालेल्या सहा नगरपंचायती आणि मुदत संपलेल्या मोहोळ, माढा आणि माळशिरस या तीन नगरपरिषदा गृहीत धरून जिल्ह्यातील आकडेवारी चुकीची दाखवण्यात आली आहे. चुकीची आकडेवारी दाखवून जिल्ह्यातील विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्याचा खटाटोप राज्य शासनातील काही मंडळींनीच केला असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केला आहे. त्यासाठी आता थेट न्यायालयात जाण्याची आमची तयारी असल्याचे सांगितले आहे.

shrikant deshmukh
जप्त वाळूसाठ्याचा १७ नोव्हेंबरला लिलाव

जिल्ह्यात भाजपची मोठी ताकद असून विकास आघाडी या निवडणुकीला घाबरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात होणारी नामुष्की टाळण्यासाठी हा प्रकार केला असून याला आता न्यायालयात दाद मागू, असा इशारा देशमुख यांनी दिला.
नामुष्की टाळण्यासाठी खटाटोप
सोलापूर विधानपरिषदेतील नामुष्की टाळण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्यातील प्रशासनाला हाताशी धरून हा उद्योग, खटाटोप केलेला आहे. पालकमंत्र्यावरती कोणाचा दबाव आहे. हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे, असेही श्रीकांत देशमुख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Police ASI
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
The programme was organised by Priyadarshini Mahila Vikas Mandal to support pilgrims during the Ashadhi Wari.
Thousands of devotees are expected to participate in the religious celebrations, with special arrangements for devotees including community fasting meals.
Marathi News Esakal
www.esakal.com