solapur district crop loss insurance issue
esakal
सोलापूर : गत खरीपात जिल्ह्यातील तीन लाख ३१ हजार शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी १८ कोटींहून अधिक हिस्सा भरला (solapur crop insurance compensation 2026) आहे. केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा मिळून ही आकडेवारी १५२ कोटींहून अधिक आहे. मात्र, आता पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील मूग, भुईमूग, मका व बाजरी या पिकांच्या नुकसानीपोटी केवळ २५ कोटी ६४ लाखांची भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी सुमारे साडेचार कोटींचे वितरण झाले आहे.