

Solapur Drought Alert Rainfall Shortfall at 53 Percent With Long Dry Spells Raising Serious Concerns Over Crop Production
sakal
सोलापूर : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाचे असमान वितरण, ऑगस्टमधील अत्यल्प पर्जन्यमान आणि दीर्घ पावसाच्या खंडामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४८१ मिलिमीटर असताना प्रत्यक्षात १९७.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, जून ते सप्टेंबर २०२६ अखेर ५३.५७ टक्के तूट दिसून येत आहे. पावसाचे स्वरूप अनियमित व खंडित राहिल्याने जिल्ह्यात वारंवार पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या दुष्काळ परिस्थिती अहवालातून स्पष्ट झाले आहे.