Farmer Relief: नुकसानभरपाईचा निधी मात्र कागदावरच! साेलापूर जिल्ह्यातील १३ हजार शेतकरी पात्र; ४६ कोटींचे वाटप अद्याप रखडले

Solapur Farmers Await Rs 46 Crore Flood Compensation: अतिवृष्टीत जमीन खरडून गेलेल्या १३ हजार शेतकऱ्यांना मदतीची फक्त आश्वासने; ४६ कोटींचा निधी कागदावर, ई-केवायसी व तांत्रिक अडचणींमुळे वाटप रखडले.
Flood Relief Stalled in Solapur 13000 Eligible Farmers Still Waiting for 46 Crore Compensation After Heavy Rains

Flood Relief Stalled in Solapur 13000 Eligible Farmers Still Waiting for 46 Crore Compensation After Heavy Rains

sakal

Updated on

सोलापूर: मागील वर्षी सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रशासनाकडून तयार करण्यात आली. जिल्ह्यातील २० हजार ४६८ बाधित शेतकऱ्यांसाठी एकूण ५७ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी १३ हजार २०४ शेतकऱ्यांना २३ कोटी ४४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात प्रशासनाकडून पंचनाम्यानुसार १३ हजार २०४ शेतकऱ्यांना २२. ४४ कोटी रुपये मंजूर केले. त्यातही आज अखेर ९४६८ शेतकऱ्यांच्याच खात्यावर ११ कोटी १४ लाख रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. अद्यापही १० हजार ९५३ शेतकऱ्यांना ४६ कोटी ४४ लाख रुपयांचे वाटप रखडले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com