

Four Solapur Martyrs and Rajguru Bhagat Singh Sukhdev A Powerful Chapter of Indias Freedom Struggle in 1931
sakal
सोलापूर : स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सोलापूरचे नाव चार हुतात्म्यांच्या बलिदानामुळे अजरामर झाले आहे. जगन्नाथ शिंदे, मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा आणि अब्दुल रसूल कुर्बान हुसेन या चौघांना ब्रिटिश सरकारने १२ जानेवारी १९३१ रोजी येरवडा तुरुंगात फाशी दिली. त्यानंतर अवघ्या ७० दिवसांनी देशाच्या दुसऱ्या टोकाला क्रांतिकारक चळवळीतील भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली. त्यामुळे सोलापूरच्या चार हुतात्म्यांपासून राजगुरू-भगतसिंग-सुखदेव यांच्या बलिदानापर्यंतचा हा काळ ब्रिटिशांविरोधातील संघर्षाची तीव्रता दाखविणारा ठरतो.