Solapur : नोकरीची मुलाखत अयशस्वी झाली म्हणून आयुष्य अयशस्वी होत नाही‌

नोकरीसाठीची एक मुलाखत अयशस्वी झाली म्हणून आयुष्य अयशस्वी होत नाही‌.
रतनचंद शहा अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुल शहा
रतनचंद शहा अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुल शहाsakal

मंगळवेढा : नोकरीसाठीची एक मुलाखत अयशस्वी झाली म्हणून आयुष्य अयशस्वी होत नाही‌. त्यासाठी प्रयत्नवादी राहून त्याला कष्टाची जोड दिल्यास निश्चित यश मिळते.अशा अडचणीतूनच उद्योजक उभे राहतात तेच स्वतःचा आणि आपल्या परीसराचा विकास करू शकतात असे प्रतिपादन रतनचंद शहा अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांनी व्यक्त केले.

श्री विद्या विकास मंडळ संचलित, श्री संत दामाजी महाविद्यालय आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी श्री विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील,उपप्राचार्य प्रा. सदाशिव कोकरे,पत्रकार प्रशांत मोरे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य योगेश बोबडे,विद्यार्थी-विद्यार्थिनी,प्राध्यापक कर्मचारी वर्ग उपस्थित होते.य

ावेळी बोलताना शहा म्हणाले की ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी नवीन उद्योग निर्माण झाल्याने नव्या संधी निर्माण झाल्या. मंगळवेढ्यातील स्थानिक उद्योजकांनी स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी दिल्यामुळे नक्कीच तालुक्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. नोकरीच्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. एकीकडे शेतीसाठी मजूर मिळत नाहीत आणि दुसरीकडे शिक्षण घेतलेल्यांना रोजगार मिळत नाही अशी विपरीत परिस्थितीही निर्माण झाली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील इक्यूबेशन सेंटरचे डायरेक्टर डॉ. सचिन लड्डा सध्याच्या काळात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत मात्र त्या नोकरीसाठी आवश्यक असणाय्रा कौशल्याचा अभाव युवकाकडे आहे त्यामुळे समाजात बेरोजगारी वाढल्याचे सांगितले जात असल्याचे भारताला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी कौशल्य संपादन करणारे युवक हवे आहेत.अशा पध्दतीने कौशल्य असलेल्याचे कौतुकही होते.

कौशल्य विकास रोजगार उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव म्हणाले कौशल्य प्राप्त उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा मेळाव्याचे आयोजन केले जाते. प्राचार्य प्रोफे. डॉ.एन.बी.पवार म्हणाले की शिक्षणातून स्वंयरोजगार निर्माण होत असतात.

पारंपारिक शिक्षणाबरोबरच कौशल्य आधारित शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. आम्ही केवळ मुलांना शिक्षण डिग्री देत नाही तर त्यांना नोकरी देतो. प्रास्ताविक डॉ.होनराव पी.एम.यांनी केले. सूत्रसंचालन दत्ता सरगर यांनी तर आभार प्रा.विनायक कलुबर्मे यांनी मानले.

या रोजगार मेळाव्यामध्ये मंगळवेढ्यातील श्याम मेडिकल, निलेश किराणा स्टोअर्स, अवताडे स्पिनर्स,मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल,खटावकर मार्ट, युरोपियन शुगर यांनी भाग घेतला त्याचबरोबर साई श्रद्धा ग्रुप तळेगाव, पियाजीओ व्हेईकल्स बारामती,आर. के. इंटरप्राईजेस सोलापूर,नवभारत फर्टीलायझर्स औरंगाबाद, चैतन्य इंडिया,सोलापूर, एशियन मॅन पॉवर कन्सल्टन्सी सोलापूर, टाटा स्ट्राईव्ह पुणे,एन.आय.आय. टी.मुंबई, धूत ट्रान्समिशन औरंगाबाद, ग्राम तरंग टेक्निकल व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग पुणे आदी कंपन्यांनी सहभाग नोंदवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com