Solapur: भीमाकाठ रक्ताळला! प्रेमविवाहातून हत्या ते जमिनीचा वाद; ६ जणांच्या हत्याकांडाचं मूळ ११ वर्षापूर्वीच्या घटनेत

Brutal Border Area Attack: सोलापूर- कर्नाटक सीमाभागात भीमाकाठ गोविंदपूर येथे जमीन वादातून सहा जणांची गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
Solapur

Solapur

esakal

Updated on

सोलापूर: महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातील गोविंदपूरमध्ये (गोळगी, ता. चडचण, जि. विजयपूर) शुक्रवारी (ता. २९) दुपारी हल्लेखोरांनी गोळ्या झाडून व धारदार शस्त्राने सहाजणांची निघृण हत्या केली. यामध्ये शेतजमीन खरेदी केलेल्या निराळे कुटुंबातील पाचजणांचा समावेश आहे. या हल्ल्यात दोघे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी विजयपूरच्या बीएलडीई रुग्णालयात दाखल केले. विरोध असतानाही जमीन खरेदी केल्याच्या रागातून हे हत्याकांड घडल्याचा पोलिसांना संशय आहे. अप्पूगौडा लक्कणगौडा गोळगी-पाटील याच्यासह दहाहून अधिक जणांनी हे हत्याकांड केल्याचा पोलिसांना संशय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

A Home Turned Silent: Mass Murder Leaves Entire Family Grieving Irreparable Loss
six people killed in Maharashtra Karnataka border land dispute vijapur chadchan crime
Crime
Shaktipeeth Highway
Marathi News Esakal
www.esakal.com