मोहोळ - 'मुस्लिम समाजाला आरक्षण द्या" या मागणीसाठी एकता समाज सेवक संस्था सोलापूरच्या वतीने सोलापूर ते मुंबई अशी पदयात्रा निघाली आहे..वरील मागणीसाठी राज्याध्यक्ष मकबूल शेख, जिल्हाध्यक्ष रवी कांबळे, अध्यक्ष इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथील मौलाना अबुकलाम चौकापासून एक जानेवारी पासून ही पदयात्रा निघाली आहे. पदयात्रेत शिवा बाहु, तनवीर शेख, रसूल शेख, अरबाज सय्यद, महबूब शेख, मोबीन शेख हे सहभागी झाले आहेत..हे कार्यकर्ते दररोज 25 किलोमीटर अंतर चालतात. मुक्कामाच्या ठिकाणी नागरिक जेवण, चहा नाष्ट्याची सोय करतात. पदयात्रेत सहभागी झालेल्या युवकांच्या हातात संविधानाचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आरक्षण अभी नही तो कभी नही असे फलक आहेत..यावेळी पदयात्रेतील सहभागी इरफान शेख म्हणाले, ही पदयात्रा 26 जानेवारी पर्यंत मुंबईला पोहोचणार आहे. मुंबई येथे जाऊन राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना भेटून मागणीचे निवेदन देणार आहोत. या पदयात्रेत दररोज विविध सामाजिक संघटना व समाजाचा पाठिंबा मिळत आहे. पदयात्रेस चोख पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
मोहोळ - 'मुस्लिम समाजाला आरक्षण द्या" या मागणीसाठी एकता समाज सेवक संस्था सोलापूरच्या वतीने सोलापूर ते मुंबई अशी पदयात्रा निघाली आहे..वरील मागणीसाठी राज्याध्यक्ष मकबूल शेख, जिल्हाध्यक्ष रवी कांबळे, अध्यक्ष इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथील मौलाना अबुकलाम चौकापासून एक जानेवारी पासून ही पदयात्रा निघाली आहे. पदयात्रेत शिवा बाहु, तनवीर शेख, रसूल शेख, अरबाज सय्यद, महबूब शेख, मोबीन शेख हे सहभागी झाले आहेत..हे कार्यकर्ते दररोज 25 किलोमीटर अंतर चालतात. मुक्कामाच्या ठिकाणी नागरिक जेवण, चहा नाष्ट्याची सोय करतात. पदयात्रेत सहभागी झालेल्या युवकांच्या हातात संविधानाचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आरक्षण अभी नही तो कभी नही असे फलक आहेत..यावेळी पदयात्रेतील सहभागी इरफान शेख म्हणाले, ही पदयात्रा 26 जानेवारी पर्यंत मुंबईला पोहोचणार आहे. मुंबई येथे जाऊन राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना भेटून मागणीचे निवेदन देणार आहोत. या पदयात्रेत दररोज विविध सामाजिक संघटना व समाजाचा पाठिंबा मिळत आहे. पदयात्रेस चोख पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.