

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
esakal
-राजशेखर चौधरी
अक्कलकोट: ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ सूचना, मदत आणि समन्वय उपलब्ध करून देणारी ‘ग्राम सुरक्षा यंत्रणा’ आर्थिक अडचणींमुळे ग्रामपंचायतींकडून नियमित निधीची तरतूद व देयकांची पूर्तता होत नसल्याने ही अत्यंत उपयुक्त सेवा आज ता. 30 जुनपासून बंद करण्याचा निर्णय घेण्याची वेळ यंत्रणा व्यवस्थापनावर आली आहे.'बहुदा जगातील सर्वोत्तम आपत्कालीन संपर्क यंत्रणा ' हे ब्रीद घेऊन काम करणारी यंत्रणा बंद झाल्याने येत्या संकटकाळात मदत कशी होईल याची काळजी मात्र नागरिकांना लागली आहे.