

Nature's Fury Strikes Farmers: Banana Fields Destroyed Across Several Villages
sakal
लवंग : ५ जून रोजी सायंकाळी साडेपाचनंतर झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वाघोली, वाफेगाव, बाबळगाव, संगम, गणेशगाव, तांबवे व लवंग परिसरातील सुमारे ३५० ते ४०० एकरांवरील विक्रीस तयार असलेले केळी पीक जमीनदोस्त झाले. घडांच्या ओझ्यामुळे केळीची झाडे मोठ्या प्रमाणात कोसळल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.