ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाचा वाढला धोका ! निखळताहेत कमानीचे दगड

पुणे व सोलापूरला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाचा वाढला धोका
Diksal Pool
Diksal PoolCanva

केत्तूर (सोलापूर) : तब्बल दीडशे वर्षांपूर्वीचा जुना, ब्रिटिशकालीन आणि चाळीस वर्षे उजनीच्या पाण्याचा खस्ता खाल्लेला व पुणे अन्‌ सोलापूर जिल्ह्यातील पुनर्वसित गावांना जोडणाऱ्या एकमेव डिकसळ पुलाच्या (British-era Diksal Bridge) भिंतीचा काही भाग निखळून पडण्याच्या बेतात असल्याने पुलाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी ग्रामस्थांनी जड वाहतूक रोखली आहे. (The British-era Diksal Bridge connecting Pune and Solapur is in danger)

Diksal Pool
पालकमंत्र्यांच्या नावे खपविले कोरोनाचे अपयश !

मुळात तर या पुलाला झालेला धोका लक्षात घेता सोलापूर प्रशासनाने या पुलावरील जड वाहतुकीस बंदी घातली आहे. असे असतानाही या पुलावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सतत चालू असते. यामध्ये ऊस व वाळू वाहतूकीसह इतर अनेक जड वाहनांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षात एक वाळू वाहतूक करणारी बोटच या पुलाच्या मध्यभागी धडकली होती. त्या वेळी एका कनाणीचा (भिंतीचा) भाग तुटला आहे. तोही स्थानिक ग्रामस्थांनी सिमेंटने बुजवून टाकला होता. त्यातच आता दगडी बांधकाम काही ठिकाणी निखळू लागले आहे. ही बाब पूर्वेकडील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या रस्त्यावरून जड वाहतूक होणार नाही यासाठी परिसरात राहणाऱ्या करमाळा (Karmala) तालुक्‍यातील सामाजिक कार्यकर्ते पंचायत समिती सदस्य नागनाथ लकडे, डॉ. गोरख गुळवे, प्रा. सुहास गलांडे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक लेनवर दगडी टाकून रस्ता तात्पुरत्या स्वरूपात बंद केला आहे; जेणेकरून जड वाहतूक होणार नाही.

Diksal Pool
लसीचा पहिला डोस बंद! दुसऱ्या डोससाठीच जिल्ह्याला साडेनऊ हजार लस

दरम्यान, या पुलाची तत्काळ डागडुजी करणे गरजेचे असल्याचे मत पुनर्वसित गावकऱ्यांनी केली आहे. हा पूल पुणे व सोलापुर जिल्ह्यातील पुनर्वसित गावांना जोडणारा दुवा मानला जातो. सोलापूर जिल्ह्यातील कोंढारचिंचोली, जिंती, पारेवाडी, टाकळी, गुलमरवाडी, खातगाव, कात्रज, पोमलवाडी, केत्तूर, वाशिंबे, सोगाव, उमरड आदी गावांना या पुलाचा वापर पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या गावांना येण्यासाठी होतो. तर पुणे (Pune) जिल्ह्यातील भिगवण, तक्रारवाडी, दौंड, इंदापूर (Indapur) तालुक्‍यातील लोकांना शेती किंवा व्यवसायानिमित्त जाण्यासाठी हाच एकमेव मार्गाचा वापर करावा लागतो.

भविष्यात हा पूल बंद पडला तर मात्र दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांना तब्बल पन्नास ते शंभर किलोमीटरचा वळसा घालावा लागणार आहे. सध्या या पुलामुळे हेच अंतर साधारण सहा किलोमीटर ते पंचवीस किलोमीटरचे आहे. त्यामुळे पुलाला मोठा धोका होण्याआधीच तो दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.

करमाळा तालुक्‍यातील कोर्टी ते टाकळी रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून चांगल्या प्रतीचा झालेला. करमाळा तालुक्‍यातील पुणे, बारामतीकडे जाणारी सर्व वाहने सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या याच प्राचीन पुलाच्या जवळचा मार्ग म्हणून वाहतुकीसाठी वापर करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com