

sakal
सोलापूर : मराठा समाजाला न्याय देण्याची महायुती सरकारची भूमिका पहिल्यापासूनच सकारात्मक राहिली आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व शंकांचे निरसन करून हा प्रश्न कायमचा तडीस नेला जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. सोलापूर जिल्हा शिवसेना कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी विधान परिषद निवडणुकीत महायुती पूर्ण ताकदीने उतरणार असून, सर्व १७ जागांवर आम्ही विजय मिळवू, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.