

Solapur Stares at Water Scarcity; Ujani Dam in Deficit, Reservoir Levels Critical
sakal
सोलापूर: मॉन्सून राज्यात दाखल झाला असला तरी सोलापूर जिल्ह्यात अद्याप अपेक्षित पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे धरणे व तलावांमधील जलसाठ्यात नव्याने भर पडलेली नसून उपलब्ध पाणीसाठा मुख्यतः मागील हंगामातील शिल्लक साठ्यावर टिकून आहे. जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या उजनी धरणात सध्या उणे २४.३७ टक्के इतका पाणीसाठा आहे, गेल्या वर्षी १८ जूनला याच धरणात ५४.७५ टक्के पाणीसाठा होता. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांत सरासरी केवळ ३३.३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. पावसाअभावी प्रत्येक घटकाने उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य वापर करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.