उजनी 110 टक्‍के! वर्षाचे झाले नियोजन, शेतीसाठी 'यावेळी' सुटणार पाणी

उन्हाळ्यातील चिंता दूर
ujani dam
ujani damSakal Media
Summary

उन्हाळ्यात मानयसमध्ये गेलेले धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने उन्हाळ्यातील चिंता दूर झाली आहे.

सोलापूर: यंदाच्या पावसाळ्यात उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणात सध्या 110 टक्‍के पाणी साठा आहे. उन्हाळ्यात मानयसमध्ये गेलेले धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने उन्हाळ्यातील चिंता दूर झाली आहे. साधारणपणे जानेवारीत एक तर मार्च-एप्रिलमध्ये (मागणी अन्‌ परिस्थिती पाहून) दोन आवर्तने सोडली जाणार आहेत. तरीही, पाणी सोडण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीमध्ये निश्‍चित होणार आहे.

ujani dam
उजनी धरण फुल्ल ! भीमा नदीत 30 हजार क्‍युसेकचा विसर्ग

सोलापूर, पुणे, नगर या तीन जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणामुळे (यशवंतसागर जलायश) जिल्ह्यात हरीतक्रांती झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांखालील लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून नवी ओळख निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील पिकांना वेळेवर पाणी मिळावे, पाण्याअभावी पिकांचे नुकसान होणार नाही, यादृष्टीने जलसंपदा विभागाने धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. दरवर्षी रब्बी हंगामात दोन आवर्तने तर उन्हाळ्यात एक आवर्तन सोडले जात होते. मात्र, शेतकऱ्यांची मागणी आणि पिकांची गरज ओळखून पूर्वीच्या नियोजनात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता रब्बी हंगामात एक तर उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडली जाणार आहेत. सोलापूर-उजनी या समांतर जलवाहिनीचे काम अजूनही पुढे सरकलेले नाही. त्यामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याची गरज पाहून नदीद्वारे वेळोवेळी पाणी सोडले जाणार आहे. परंतु, त्याचे नियोजन कालवा सल्लगार समितीच्या बैठकीत अंतिम होणार आहे.

ujani dam
शंभर टक्‍क्‍यांच्या उंबरठ्यावर उजनी धरण! बळीराजाची मिटली चिंता

उजनी धरणात 110 टक्‍के पाणी साठा आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने उन्हाळ्याची चिंता मिटली असून पाण्याचे काटकसरीने नियोजन केले जाईल. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पुढील नियोजन निश्‍चित होईल.

- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा, सोलापूर

ujani dam
उजनी धरण ओव्हरफ्लो; टेमघर धरण क्षेत्रात पाऊस ओसरला

कोरोनामुळे पाणीपट्टी वसुलीला ब्रेक

उजनी धरण जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. धरणातील पाण्यातून उन्हाळ्यात नागरिकांसह शेती पिकांची व जनावरांची तहान भागविली जाते. दरम्यान, उजनी धरणातून सोडलेल्या पाण्याची पाणीपट्टी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर थकीत आहे. दुसरीकडे महापालिकेकडेही मोठी थकबाकी आहे. कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांकडील पाणीपट्टी वसुलीला ब्रेक दिला. मात्र, शेतकऱ्यांनी वापरलेल्या पाण्याचा मोबादला वेळेत भरल्यास धरणाची देखभाल-दुरुस्ती शक्‍य आहे. त्यामुळे सर्वांनी पाणीपट्टी भरावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com