
पंढरपूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रातून दौंड येथे येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने बुधवारी (ता. २९) उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग देखील कमी करण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने पंढरपूर शहरातील संभाव्य पुराचा धोका टळला आहे.